tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post636734602144087239..comments2023-03-20T18:42:16.520+05:30Comments on संदिग्ध अर्थाचे उखाणे: मराठी कथेचं कृष्णविवर आणि परिघावरचा वाचक Samvedhttp://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-19862180331005079032013-12-21T12:28:16.877+05:302013-12-21T12:28:16.877+05:30मित्रांनो, प्रतिक्रियेवर उत्तर द्यायला अंम्मळ उशीर...मित्रांनो, प्रतिक्रियेवर उत्तर द्यायला अंम्मळ उशीर झालाय. वीकेन्ड-पॅरेन्ट्स असतात तसा मी वीकेन्ड-लेखक(!) झालोय. <br />मेघना- जुना रंग बघून मला वीट आलाय. लिहिण्यात उजेड आणि ब्लॉग कसले सजवायचे? नीट गाडी रुळावर आल्यावर बघू..मला नाही वाटत कथा फॉर्म म्हणून irrelevent झाली आहे. irrelevent झालाय ते कथेचं बीज असं मला वाटतं. ब्लॉगचा मुद्दा हा या संदर्भात होता. प्रचलित अर्थाचे कोणतेच खर्च नसल्याने कथेबद्दलचे प्रयोग, तिला relevent करण्यासाठी लागणारे विषय, तिच्या नव्या स्वरुपाला पेलु शकणारे लेखक इ इ ब्लॉगवर सहज शक्य होतं. ती संधी आपण जवळ जवळ गमावलीच असं मला म्हणायचं होतं.<br /><br />राज- वरचा मुद्दा परत उगाळत नाही. पण तुझं साहित्याला वाहीलेले ब्लॉग किती या प्रश्नाचं उत्तर मला तरी माहीत नाही. माझा (उगाच) असा अंदाज आहे की बाहेरची जनता आपल्या मानाने जास्त सक्रिय असावी. तिकडल्या काही भक्तांचे ब्लॉग मी अधेमधे वाचतो पण मग त्यांचे देवही थोर आहेत, शेक्सपिअर न दांटे न काय काय. या चालीवर उद्या कुणी महाभारतावर ब्लॉग सुरु केला तर तुला नाही वाटत की तो थोर आणि साहित्यीक होऊ शकेल म्हणून? निदान शक्यता तरी आहे. आपल्या लेखकांची आर्थिक स्थिती अजूनही तशीच खडतर आहे का रे की त्यांनी फुकट विरुद्ध रॉयल्टी (तेच ते....१२ वर्षात १००० प्रतींच्या २ छापण्या काढल्या राव!) असा विचार करावा? म्हणजे कॅप्टन ध्रुव लिहीणाऱ्या कुण्या लेखक प्रकाश वेदनं असा विचार केला तर मी समजु शकतो रे. स्टेशनावर ज्याम खपतात तशी पुस्तकं...<br /><br />परत मेघना- हा प्वाईंन्ट पण बरोबर. रे रे चं नाहीच बोललं तर बरं होईल. मी डायरेक्ट भीमराव पांचाळ रचीत जखमा अश्या सुगंधी गायला सुरुवात करेन तर तुला भारी पडेलSamvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-90933876370180722412013-12-16T21:47:54.078+05:302013-12-16T21:47:54.078+05:30राजच्या कमेंटवर विचार केल्यानंतर -
पूर्वी कथा कुठ...राजच्या कमेंटवर विचार केल्यानंतर - <br />पूर्वी कथा कुठे छापून येत असत संग्रह निघण्याआधी? नियतकालिकांत. नियतकालिकांना कुणीतरी एक संपादक असे. त्याची काहीएक भूमिका असे. त्यानं काही वर्षं काही बरं, वाचायजोगं निवडून छापल्यावर, त्याची पुण्याई जमा होई आणि त्याच्या पुण्याईवर विसंबून त्याच्या नियतकालिकातल्या कथांनाही (कथा म्हणजे कथा असं नाही. वाचायजोगं काहीही) ही पुण्याई चिकटे. जालावर संपादक इल्ले. त्याचे फायदे आहेत ते आहेत. पण तोटेही आहेत - ते म्हणजे अमुक एका ठिकाणी आपलं छापून यावं असं आमिषच नाही. काहीही लिहा, छापलं जाईलच. पैशाचं मरू दे. ते तसेही मराठी साहित्यात कधीच नव्हते. पण ’इथे आलं बॉ छापून’ अशी शेखी स्वत:शीतरी मिरवावी असं ’निवडक’ छापणारा प्लॅटफॉर्मच नाही. <br />रेरेबद्दल: आपण घाऊक माती खाल्लेली आहे. Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-86513286539793594952013-12-16T12:03:40.965+05:302013-12-16T12:03:40.965+05:30ब्लॉग साहित्याचं एक माध्यम होऊ शकलं असतं हे तितकसं...ब्लॉग साहित्याचं एक माध्यम होऊ शकलं असतं हे तितकसं पटत नाही. अगदी जागतिक पातळीवर बघितलं तरी किती ब्लॉग साहित्याला वाहिलेले दिसतात आणि त्यात किती प्रकाशित होण्याइतके यशस्वी होतात? ज्यांच्या ब्लॉगची पुस्तकं निघतात ते बहुतेक <br />वेळा इतर विषयांवरच असतात. मराठीत मुख्य अडचण आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार ही आहेच. मराठीतील बहुतेक प्रथितयश लेखक ब्लॉगकडे वळलेच नाहीत. (आपण लिहीलेलं लोकांना चक्क फुकट वाचायला द्यायचं?) जे थोडेफार आहेत ते आपण रोज केर काढतो तसे ब्लॉगवर पोस्ट टाकतात. मग कधी वर्तमानपत्रात छापून आलेला लेख इकडे पेस्टवायचा, (पैसे मिळालेत ना, मग हरकत नाही). बरेचदा एखाद्या लेखकाचं पुस्तक आणि ब्लॉग वाचला तर ते सकस लिखाण पुस्तकासाठी राखून ठेवत आहेत असं लक्षात येतं. शिवाय दुसरं म्हणजे कमीत कमी कष्टात काम व्हायला हवं आहे. सध्याच्या मराठी वर्तमानपत्रांच्या ऑनलाइन एडीशन वाचणे म्हणजे छळ असतो. सगळीकडे झैराती भरलेल्या, मजकूर वाट्टेल तसा कोंबलेला, दोन प्यारामध्ये एक स्पेस टाकावी नाहीतर एडीटरच्या मर्जीप्रमाणे कुठेही स्पेस पडते, वाक्ये लोंबकळतात काय वाटेल ते चालू असतं. त्या मानाने ब्लॉवगवरचं एडीटींग सुबक असतं आणि बरेचदा ब्लॉवरचे लेख अधिक काळजीपूर्वक लिहीलेले आढळतात. "भारतात शास्त्रज्ञ नाहीत.." वगैरे कैच्याकै विधानं करायची, संदर्भ द्यायचे नाहीत हे प्रकार वर्तमानपत्रात फार आढळतात. Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8126177231338765407.post-70448965532553433702013-12-15T22:08:17.616+05:302013-12-15T22:08:17.616+05:30बदललेली रंगरंगोटी बदल म्हणूनच स्वागतार्ह. एरवी काह...बदललेली रंगरंगोटी बदल म्हणूनच स्वागतार्ह. एरवी काही फारशी आवडण्यात आलेली नाही. पण ते असो. पोस्टबद्दल:<br />मला इतकं ठाम समीक्षात्मक असं काही म्हणताना जाम अधांतरी वाटतं. त्यामुळे माझा सूर डळमळीत लागणार. नि ते बरंच आहे. मला वाटतं, कथा लिहिली जात नसेल तर तो आजचा फॉर्म नसेलच. हे सुटकावादी विधान वाटतंय? हं, मलाही. पण तरीही तसंच वाटतंय. माझ्या वाचनाच्याच सवयी इतक्या वेगात नि इतक्या आमूलाग्र बदलत चालल्याहेत... वाचनाचा आवाका झपाट्यानं कमी होतोय, असं म्हटलं असतं. पण मी कादंबरीइतक्या लांबीच्या भल्यामोठ्या फॅनफिक्स वाचण्यात मी अजूनही रात्री खर्ची पाडतेय, त्यामुळे प्रश्न आवाक्याचा नसावा. मला हव्या असलेल्या ठिकाणी (अर्थातच जालावर) मला हव्या असलेल्या रिलेव्हन्ससकट (मला ज्याच्याशी काही नातं सांगता येईल अशा प्रकारे) काही मिळालं तर मी ते वाचीन, एरवी तू म्हणालास तसं जग जवळ आलेलं आहे. बाकी ब्लॉग्स ही खरंच संधी होती का? काही हातांच्या बोटांवर मोजून संपतीलसे अपवाद सोडले तर मराठी ब्लॉगांवर जे काही लिहिलं जातंय ते पाहता मला मराठी ब्लॉग नि मराठी कथा या दोन संज्ञा एका वाक्यात वापरायचीही लाज वाटतेय.Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.com