Posts

Showing posts from March, 2008

ऋतुसंभव

लहानपणी मोठ्ठेच प्रश्न पडायचे. निबंध यायचा "माझा आवडता ऋतु". नक्की वसंत, शिशिराबद्दल लिहायचे की हिवाळा, पावसाळा या बद्दल लिहायचे हे ठरे पर्यंत पेनचं नीब वाळून जायचं. असं वाटायचं की सध्याचा जो ऋतु आहे त्या पेक्षा नेहमीच दुसरा कोणताही ऋतु चांगलाच असणार. पावसाळ्यात पाऊस पडून सगळा राडा होणार, हिवाळ्यात ऎन थंडीत खाकी चड्डी घालून सकाळी सकाळी शाळेत जावं लागणार आणि उन्हाळा म्हणजे तर सगळी कडे कहर नुस्ता. पण मग ऋतुंना नवे गंध, रंग, चव आणि स्पर्शही फुटले. धम्म पिवळा आंबा आणि डझनांनी पुस्तकं घरी आली की ओळखायचं उन्हाळा आला. मोगरयाचं फुल टाकलेलं माठातलं डोहगार सुगंधी पाणी, कधी फ्रीज मधलं कॉनसन्ट्रेटेड रसना डायरेक्ट प्यायची लहर, वेलची टाकलेलं पन्हं आणि कैरीची वाटलेली डाळ... कुणाची बिशाद आहे उन्हाळ्याला वाईट म्हणण्याची! ऎन पावसाळ्यात तासंतास पन्हाळीचं पाणी ओंजळीत जमा करत खिडकीत डोकं टेकवुन डोळे कधी स्वप्नांनी तर कधी पाण्याने भरण्याचे ही काही ऋतु होतेच कधी. गवताच्या पात्यावर टेकलेला एखादाच चुकार थेंब टिपलाच नाही तर मोती बनेल याची खात्री देणारा रंगबावरा ओला ऋतु. छत्री, रेनकोट न उघडताच रस्त्याव

Photos..again

Image
एका जुन्या पोस्ट मधे नव्या कॅमेराबद्दल लिहिलं होतं. बरेच फोटॊ काढून झाले. एका छोटी झलक.. मु.पो. मुरुड जंजीरा

"आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?"

"लिखाणामागच्या प्रेरणा आणि चौकटी" मेघनाने दिलेला खो स्विकारुन ही खेळ मी पुढे चालु ठेवत आहे. कोणत्याही कलेमागच्या प्रेरणा या काही मुलभुत मुद्यांभोवती फिरत असतात. त्या मुद्यांना हात घालण्याआधी या लिखाणाच्या आणि त्याच्या अनुषंगाने येणारया कलांच्या उल्लेखाच्या सीमा रेषा स्पष्ट केलेल्या बरया. आदी कला म्हणून ज्यांचा उलेख्ख करता येईल अश्या तीनच कला; चित्र, नृत्य आणि संगीत. कोणत्याही पुरातन संस्कृतीचा अभ्यास केला तरीही परत परत हेच सत्य अधोरेखित होत राहाते. आदी मानवाने त्याच्या भाव-भावनांना वाट करुन देण्यास अत्यंत मुल स्वरुपात या कलांचा वापर सुरु केला. आणि त्या नंतर भाषा आली. भाषेचे महत्व केवळ संभाषणाचे साधन एव्हढेच न राहाता विविध आदी कलांचे "प्रोसेसायझिंग" करणे असे ही आहे. कुणी चित्रकार चित्र काढतो म्हणजे त्याच्या मनातील मुर्त-अमुर्त विचारांना तो चित्रातुन व्यक्त करतो किंवा कुणी मृदुंगावर तडधमची थाप देतो, त्यामागे एक विचारप्रक्रिया असते. माणसाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीनंतर चित्र, संगीत आणि नृत्य या केवळ संवादा पुरत्या मर्यादित न राहाता अभिजात कलांमधे परावर्तित झाल्या आणि सर

रावणाप्पा

वेगळ्याच संदर्भात मला आज जुनी कविता आठवते "स्विकाराचा वा नकाराचा पर्याय नसावा तशी गुणसुत्रातुन आपसुक वाहात आलेली नाती.. " किंवा असचं काहीसं लिहीलेलं कधी काळी. मला लख्खकन रावणाप्पा आठवतो. नावात काही नसतं पण ओळखी दडवल्या की खपलीखालच्या काही जुन्या जखमा बिनचेहरयाच्या वाटु शकतात म्हणून ही धडपड. एक शक्यता, दुसरं काय? रावणाप्पाच्या गोष्टीला कन्फेशन म्हणुया? पाप कबुल करण्याला कन्फेशन म्हणतात. वास्तवमांडणीच्या अनुभुतीला काय म्हणतात? प्रश्नचिन्हांखालची टिंबे पुर्णविरामात बदलण्याआधी मला ही गोष्ट सांगायलाच हवी. "रावणाप्पा, पाणी आणता का हो पटकन? पुजा खोळंबली आहे" वहिनींची हाक इतकी खणखणीत होती की त्या चौसपी वाड्यात किती तरी वेळ तो आवाज घुमत राहीला. मोठं शुन्य. सामंत पुजा सोडून तरातरा चालत निघाले. वाड्याच्या दहा-बारा खोल्या ओलांडुन येताना त्यांचा संताप वाढतच चालला होता. डोक्यावरचं माळवद करकरलं तसं छताचं तेलपाणी राहीलेलं आठवुन त्यांच्या संतापाचा पारा फुटण्याच्या बेतात आला. रावण कुठे असेल हे त्यांना नक्की माहित होतं. ते पडवीत आले तसा आडापाशी पाणी शेंदण्याच्या बादलीत काही तरी करताना

बडेबां

क्लासचा पहीलाच दिवस. राशिदला भेटलो. राशिद म्हणजे बडेबांचा मुलगा. बडेबांच्या दृष्टीनं तो त्यांचा एकटाच मुलगा होता. मुजाब, बडेबांचा मोठा मुलगा, त्यांच्या दृष्टीने असुर होता. ज्याला गाता येत नाही असा तो: असुर!. अर्थात मुजाबचा मुलगा, बडेबांचा नातु समर मात्र त्यांचा प्रचंड लाडका होता. पोरगा होता लहान पण बेट्याचा गळा म्हणजे मध होता नुस्ता. अर्थात ही सारी माहिती क्लास सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी मिळालेली. बडेबांकडे शिकायचं म्हणजे मार खायची तयारी ठेवायची एव्हढं गणित गाणं शिकु ईच्छिणारया प्रत्येकाला माहित होतं आणि तरीही त्यांच्याकडे गाणं शिकायला कायमच गर्दी असायची. कुठल्याच कोरया पाटीला ते क्लासमधे घ्यायचे नाहीत. किमान सुरात सरगम म्हणण्याइतपत शिक्षण झालं असेल तर त्या अर्धकच्च्यांच लोणचं राशिद घालायचा. राशिदनं साफ केलेले गळे पुढे बडेबां तासायचे. तर क्लासचा पहीलाच दिवस आणि "म्हणा" राशिदनं आदेश सोडला "काय येतं ते म्हणा." भुप! पर्यायच नाही. सर्वत्र शिकवला जाणारा पहीलाच राग म्हणजे भुप. घसा साफ केला, तंबोरयावरुन हात फिरवला आणि आरोह घेतले "सा रे ग प ध सा" डोळ्यासमोर किश