आजीची गोष्ट

देशपांडे गल्लीच्या वळणावर गाडी आली की माझं रडणं सुरु व्हायचं " मी आज्जी कडे राहाणार नाही". लहान होतो, कोण ऎकणार? बहुतेक वेळा ताई सोबत असायची, तिला फार आवडायचं आज्जीचं घर. एकाच गावात आहोत तर कधी कधी आज्जी कडे का राहायचं हा कधीच उत्तर न मिळालेला प्रश्न डोळ्यात नाचत असतानाच आज्जीचं घर यायचं.

आज्जीचं घर होतं लहान पण होतं गोष्टीतल्या सारखं. एक अंधारं स्वयंपाघर, बाहेर एक पडवी, छोटं अंगण, मग वरची खोली, तिच्या बाहेर गाय बांधलेली. प्रत्येक जागेची आपली एक ओळख होती. स्वयंपाघर भलं चांगलं आडवं होतं, गणितातल्या आयता सारखं. त्याला दोन छोट्या पण ऊंचं खिडक्या होत्या. बहुतेक वेळा तिथे अंधार असायचा आणि आज्जीची आणि आमची खूडबूड. आज्जी खाली बसून स्वयंपाक करायची आणि आम्ही तिच्या आजूबाजूला उंडारायचो. घरून आणलेली पुस्तके संपली की आज्जी कडचं सुपरहीट पुस्तक "चातुर्मास" ही चालून जायचं, कधी कधी बिचारं दाते पंचांगाचाही नंबर लागायचा, पण ते फार बोअर होतं.

आमचं मुख्य आकर्षण होती ती वरची खोली. तिच्या खाली एक तळघर आहे आणि त्यात खजिना आहे असं कुणीतरी आम्हाला सांगीतलं होतं त्यामुळे आमच्यातला फास्टर फेणे कायमचं जागा असायचा. असो. त्या खोलीत एक भली मोठी पेटी होती, मिलीट्रीवाल्यांची असते तशी. जगातील कोणतीही वस्तू त्यात मिळेल असा आम्हाला सार्थ विश्वास होता. मामाची भली जड पुस्तकं, कसल्या कसल्या नोट्स...काहीही त्यात मिळायचं. त्या खोलीत देवीला वाहीलेली एक तलवारही होती. ही...जड, शिवाजीची कीवचं यायची. त्या खोलीच्या समोरचं आज्जीची गाय होती. तिच्या एका वासरवर मी लहानपणी हक्क सांगीतला होता, आठवलं की मजा वाटते, ते माझं वासरु होतं.

आज्जीकडचा आमचा ६०-७०% वेळ जायचा तो पडवीत. भला मोठा एक पलंग, त्याची मी बस करायचो. त्याच्या रेलींग मधे पाय सोडून फुर्र्र्र केलं की ती बस कुठेही जाऊ शकायची. तो पलंग आजोबांचा होता. आम्ही त्यांना काका म्हणतो कारण आई आणि मावश्याही त्यांना काका म्हणतात. आज्जीचं आवरुन झालं की तिने टाकलेल्या सतरंजीवर आम्ही मांजरासारखे जमा व्हायचो. गुडगुड आवाज करणाय्रा उषाच्या काळ्या टेबलफॅन समोर बसण्यासाठी ही..भांडाभांडी करायचो! गप्पा मारत, पेंगा मारत हातांनी हळूच शेणाने सारवलेली जमीन उकरताना भारी सुख वाटायचं. आज्जी/काकांच लक्ष गेलं की दटावणी पडायची. पण ते शेणाचे पोपडे काढताना खरचं फार मजा यायची. गंगा दुसय्रा दिवशी सारवून सगळं सारखं करायची.

काका म्हणजे माझे आजोबा- स्वातंत्र्यसैनिकं-निझामाविरुध्द लढलेले. कधीकाळी त्यांनी नौकरी केली असावी असा मला बरेच दिवस संशय होता, मोठेपणी कळालं की ते कोर्टात काहीतरी होते. पण मला आठवतात तसे ते कायमचं पडवीत फेय्रा मारायचे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात काय केलं हे नक्की कळण्याचं ते वय नव्हतं पण त्यांच्या कोटाचा, गांधी टोपीचा आणि मुख्य म्हणजे ते दर १५ ओगस्ट/२६ जानेवारीला कलेक्टरसोबत परेड पाहातात याचा आम्हाला फार अभिमान. एकदा गंमतच झाली. आम्ही वाड्यात खेळत होतो आणि एक म्हाताय्रा आजोबांनी मला विचारलं, "जंगल आहे?" "जंगल? हे भूमकरांचं घर आहे" आजोबांनी माझ्या आरपार पाहात करडया आवाजात सुनावलं "तेच ते, जंगल म्हणजे तुझे आजोबा. रझाकारांच्या काळात ते जंगलात लपले होते, म्हणून आम्ही त्यांना जंगल म्हणतो" झालं..... आम्ही गार!! काका आम्हाला कुठल्याही रहस्यमय कथेतील हिरोच वाटले.

पण या सगळ्यात मुख्य आकर्षण होती आज्जी -इतकी की तिच्या घराला आम्ही आजही, ती नसतानासुध्दा, आजीचं घर म्हणतो. तिला पाहाताच डोळ्यात भरायची ती तिची सणसणीत उंची. तिच्या उंचीमुळे तिला तिच्या मापाच्या चपलापण नाही मिळायच्या! तिच्यामुळे आज्जी म्हटलं की नऊवार पातळ घालणारी बाई असा माझा कित्येक वर्ष समज होता. वयानुसार तिच्या डोळ्यात आलेला समजुतदारपणा कदाचित तिने पाहीले-भोगलेल्या परिस्थीतीमुळे ही आला असावा.
कळत्या वयात समजलं की काकांच्या पायांनां लागलेल्या भिंगरी मुळे आख्खा संसारगाडा कित्येक वर्षांपासून आज्जीच ओढत होती. एकत्र कुटूंब, पदरात ६ मुलं, सतत येणार-जाणार असलेलं घर अश्या परिस्थीत तिने घेतलेला सगळ्यात क्रांतीकारी निर्णय म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा; नीट सांगायचं तर ५ मुली आणि १ मुलगा या सगळ्यांच्या शिक्षणाचा. आज ऎकायला विशेष वाटत नसलं तरी ४५-५० साली मुलींचं शिक्षण- उच्चं शिक्षण ही चैन होती.. तिनं ते कसं जमवलं माहीत नाही.
तिच्या शिस्तीचे बरेचसे कंगोरे आम्हा नातवंडासाठी बोथट होते, त्यातही ताई, मी, मेघा पहीली नातवंड होतो, जवळ होतो म्हणूनही असेल! तिच्यासाठी दुधापेक्षा दुधावरची साय जास्त जाड होती!!
तिची उंची जशी लक्षात यायची तशीच त्या उंचीला साजेसा तिचा स्वाभिमानही. तिचा कणा कायमच ताठ होता-तिच्या शेवटच्या दिवसांपर्यंत..कोणत्याही बाबतीत कोणासमोरही तोंड वेंगाडायला तिला आवडायचं नाही. कोणत्याही गोष्टीसाठी ती कोणावरही अवलंबून नसायची.

काळ, काम, वेगाच्या गणितं सोडविताना, आपण कधी कसली गॄहीतके हाताशी घेतो. त्यांच्या असण्याची इतकी सवय होते की ती गॄहीतके आहेत हेच मुळी आपण विसरुन जातो. "समय की मार होती है बडी कठीन" असं बच्चन म्हणतात तेंव्हा त्याचा प्रत्यय घ्यावाचं असं नव्हे. पण एखाद्याचा गाता गळाच कोणी कापावा हे जितकं क्रूर आहे तितकंच क्रूर आहे एखाद्याचा स्वाभिमान चुरगाळणं. ताठ मानेनं जगत आलेल्या माझ्या उंच्यापुरया आज्जीला पार वाकवलं ते तिच्या गुढघेदुखीनी..अंथरुळालाच खिळली ती. त्यात परत तिला आम्ही तिच्या घरातून आमच्या घराजवळ असणारया तिच्या दुसरया घरी आणलं. तिची रोजची माणसं तिला दिसेनाशी झाली. मग सारंच बिघडत गेलं. कसल्याशा उपचारासाठी तिला पुण्यात मामा कडे नेण्याचं ठरलं. त्यावेळी मात्र तिने आकांत मांडला. जमिनीत खोलवर मुळं गेलेलं झाड कधी उपटून पाहीलय तुम्ही? किती कठीण आणि वेदनादायी असतं ते, तसंच काहीसं झालं. माणूस मोठा झाला की कसलीच सक्ती करता येत नाही. आज्जीच्या हट्टापाई तिला आम्ही परत लातूरला आणलं. सगळ्यांनी एकच निदान केलं, जगण्याची तीव्र अनिच्छा.

आता आज्जी नाही

आजही आज्जीच्या घराकडे गाडी वळली की मला रडू फुटते. पण आता आज्जी नाही तसे तिचे घरही नाही.

Comments

Oxymorons said…
hi

This is really very nicely written. Aaji hi vyaktich muli ashi aste ki tichya athvanini saglech halve hot astat..

Anyways keep writing
Anonymous said…
Dear Samved,
You write so good.Keep it up.But why didn't you give your complete name.The place you mentioned is familier to me,yes I am also from Latur.It was kind of nostalgia..for me..
pravin.
Samved said…
Thanks a lot for your comments..it's encouraging!

Samved
Punit Pandey said…
Just to inform you that your blog has been added into Marathi Blogs aggregator - MarathiBlogs.com. I would appreciate if you can give us a link back. Also please let us know your opinion about it.

-- Punit
Anonymous said…
sundar!
HAREKRISHNAJI said…
Photo Upload.
It's very simple and fast with
Google's photo organiser, Picasa.
Picasa is a free software download it’s fast, easy and free.

After downloading Picasa, once you open it, it will automatically trace all photos on your machine and will pick up photos.

Bottom, you will find icon "BLOG", just select photo and click on the icon, photo will be immediately uploaded on Blog.

No more long waiting period for uploading photos.
रोहित said…
सुंदर! तुमच्या आजीच्या स्मृतीला माझंही अभिवादन.
Samved said…
Thanks Rohit. switching to your blog now. kunala kay aawadta yavarun konashi kiti tara julanar lagech kalata..i am quite convienced about it.
Let me check my theory with your blog:)

Samved
Anonymous said…
excellent !! Keep writing Samved
darshana said…
Mala aathavanari aapli aaji ti mhanje walker ghun chalnari...
aajji cha sahavas khup nai milala karan ti Latur madhe aani me Kalyanla pan May chi sutti havishi vataya chi ti fakt AAJJI chya tithe asnyamule.chalata yet nastana hi walker gheun Kichen madhe aaplyasathi Dose Basundi aasha aaplya fermaishi purya karnari aapli aajji...
agdi goshtitlya aajji sarkhi.
aaj aajji nastana aajji chya ghari 4 varsha rahatana asa vatata ki aaj aajji asti ter.... tichya saglya Natvanda madhe me lucky asle aste.
Aajji astana tila kadhi asa sangata aalacha nai but ..aajji v all love u lot n v all miss u lot.
darshana said…
Mala aathavanari aapli aaji ti mhanje walker ghun chalnari...
aajji cha sahavas khup nai milala karan ti Latur madhe aani me Kalyanla pan May chi sutti havishi vataya chi ti fakt AAJJI chya tithe asnyamule.chalata yet nastana hi walker gheun Kichen madhe aaplyasathi Dose Basundi aasha aaplya fermaishi purya karnari aapli aajji...
agdi goshtitlya aajji sarkhi.
aaj aajji nastana aajji chya ghari 4 varsha rahatana asa vatata ki aaj aajji asti ter.... tichya saglya Natvanda madhe me lucky asle aste.
Aajji astana tila kadhi asa sangata aalacha nai but ..aajji v all love u lot n v all miss u lot.